Ad will apear here
Next
‘प्रत्यक्ष अनुभव व कामातून ज्ञानप्राप्ती ही रोजगारक्षमतेची किल्ली’
विवेक सावंत यांचे प्रतिपादन
मनोविकास प्रकाशनच्या वतीने औद्योगिक मानसशास्त्राची उत्कंठा वाढविणाऱ्या ‘कॉर्पोरेट कल्लोळ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी विवेक सावंत, डॉ. राजेंद्र बर्वे, नीलांबरी जोशी, दीपक घैसास आणि अरविंद पाटकर उपस्थित होते.

पुणे : ‘आज आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान आणि ठोकताळे यांवर आधारित शिक्षण दिले जाते मात्र रोज येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपली शिक्षण पद्धती तितकीशी सक्षम नसून, ती बदलत महात्मा गांधी यांची ‘नयी तालीम’ अर्थात प्रत्यक्ष कामातून अनुभूती व त्या अनुभूतीमधून ज्ञानाची प्रचीती याचे अनुकरण केले गेले पाहिजे. केवळ पुस्तकांवर अवलंबून न रहाता प्रत्यक्ष अनुभवामधून शिकणे महत्त्वाचे असून, आजच्या काळात हीच रोजगारक्षमतेची गुरुकिल्ली आहे’, असे मत महाराष्ट्र नॉलेज कोर्पोरेशन लिमिटेड अर्थात एमकेसीएलचे संचालक विवेक सावंत यांनी व्यक्त केले.

पुण्यातील मनोविकास प्रकाशनच्या वतीने आयोजित ‘कामाच्या ठिकाणचे ताणतणाव’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सावंत बोलत होते. आय फ्लेक्स सोल्युशन लिमिटेडचे अध्यक्ष दीपक घैसास आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि लेखक डॉ. राजेंद्र बर्वे, मनोविकास प्रकाशनचे संस्थापक संचालक अरविंद पाटकर, आशीष पाटकर या वेळी उपस्थित होते. याबरोबरच मनोविकास प्रकाशन यांच्या वतीने निलांबरी जोशी लिखित ‘कॉर्पोरेट कल्लोळ‘ पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.

सावंत पुढे  म्हणाले, ‘महात्मा गांधी यांनी अहिंसेपेक्षा देशाला मोठी देणगी दिली आहे ती म्हणजे नयी तालीम. यामध्ये असलेला शिक्षण प्रक्रीयेमागील मूलभूत विचार आपण अवलंबिला पाहिजे. शाळेत क्लोज एंडेड प्रश्नांना सोडचिठ्ठी देत, त्याच प्रश्नाची  वेगवेगळी उत्तरे सर्वजण कसे देतील याचा विचार झाला पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांमधील भाषिकज्ञान, संभाषण कौशल्य, सांघिक कौशल्य, डिजिटल स्कील्स, सॉफ्ट स्कील्स वाढण्यास मदत होईल. यामुळे केवळ ‘स्मार्ट’ नाही तर ‘वायजर’ होण्याच्या दृष्टीने आपण पाऊले टाकू शकू.’ 

याबरोबरच सावंत यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी केलेल्या अनेक प्रयोगांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘कॉर्पोरेट जगात एक व्यक्ती मालक आणि एक कर्मचारी हा भेदभाव मला न पटणारा आहे. कर्मचारी हा कधीही एक उपभोग्य वस्तू, मानवी भांडवल, मानवी संसाधन नसतो तर तो संस्थेचा एक भागधारक असतो.’

‘यशस्वी उद्योग हा यशस्वी समाजाची निर्मिती करतो. तर पुढे यशस्वी समाजातच अशा यशस्वी उद्योगांची निर्मिती करता येऊ शकते. ‘कॉर्पोरेट कल्लोळ’ या पुस्तकात नेमके हेच लक्षात घेत कर्मचारी, त्यांच्या अपेक्षा, त्यांना येणाऱ्या समस्या, कामाची ठिकाणे या सर्वांसंदर्भात होणारे संघर्ष यांचे वर्णन करण्यात आले आहे. मालक आणि कामगार यांमधील द्वंद्वाचे रुपांतर मैत्रीत कसे करता येईल याचा विचार देखील या पुस्तकात मांडला आहे’, असेही सावंत यांनी नमूद केले. 

डॉ. राजेंद्र बर्वे म्हणाले, ‘आज कॉर्पोरेट जगाला गौतम बुद्धांच्या ‘माइंडफुलनेस’ या तत्त्वाची गरज आहे. आपण आज फक्त माहितीने परिपूर्ण आहोत. यामध्ये त्या विषयाचे ज्ञानाचा समावेश नाही. ज्ञान ग्रहण करण्यास आपण कमी पडत आहोत. याबरोबरच केवळ स्वत:चा विचार न करता आपली टीम, संस्था यांचा देखील विचार होणे गरजेचे आहे.’

घैसास यांनी कर्मचारी हा आपल्या कंपनीचा एक अविभाज्य भाग असे मानत कशा पद्धतीने वागले पाहिजे याची काही उदाहरणे दिली. याबरोबर कंपनी आणि कर्मचारी यांना आलेल्या अडचणी कशा पद्धतीने सोडविल्या याचे काही अनुभवदेखील उपस्थितांना सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZSDBR
Similar Posts
मनोविकास प्रकाशनतर्फे २९ जूनला चर्चासत्राचे आयोजन पुणे : ‘अर्थरचनेतील समस्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणाऱ्या अच्युत गोडबोले लिखित ‘अनर्थ’ या पुस्तकानिमित्त मनोविकास प्रकाशनातर्फे एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र शनिवार, २९ जून रोजी सायंकाळी सहा वाजता टिळक रस्त्यावरील पद्मजी सभागृहात होईल,’ अशी माहिती ‘मनोविकास’चे संस्थापक अरविंद पाटकर यांनी दिली
‘ज्ञानार्जनाला नवतंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक’ पुणे : ‘आज तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. मोबाइलसारख्या उपकरणाच्या मदतीने अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. तेव्हा शिक्षकांनी अधिकाधिक ‘स्मार्ट’ होत अध्यापन करावे. ज्ञानार्जन करताना त्याला नवतंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सुकर आणि आनंददायी होईल,’ असे मत महाराष्ट्र ज्ञान
‘कुतूहल हरवता कामा नये’ पुणे : ‘अनेक विषयांचे मला प्रचंड कुतूहल वाटते. त्यात मी झोकून देतो. तो अभ्यास पुस्तकाच्या रूपाने लोकांसमोर आणतो. साठच्या दशकात मी बंडखोरीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकले. पाश्चात्त्य संस्कृतीविषयी पुस्तके लिहिताना तिथल्या संगीताविषयी लिहायचे ठरवले होते. त्यामुळेच ‘सिंफनी - पाश्चात्य संगीताची सुरेल सफर’ हे पुस्तक लिहिले
‘सरकारने मूलभूत गरजांवर खर्च करावा’ पुणे : ‘मेट्रो आणि मोनोरेल आदी सुविधा देण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारने आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत गरजांवर खर्च करावा,’ अशी अपेक्षा मुंबई येथील केईएम रूग्णालयाचे अधिष्ठता डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केली. मनोविकास प्रकाशन, जन आरोग्य अभियान आणि पुना सिटीझन–डॉक्टर फोरम यांच्यातर्फे आयोजित

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language